News Bharati

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई(Mumbai) हाय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर(Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. विशेषतः नवरात्रौत्सवाच्या कालावधीत, जेव्हा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तेव्हा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने सूचित केले आहे.

मुंबईत (Mumbai)गरबा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा तपासणी सुरू आहे.

सेंट्रल एजन्सींच्या सूचनांनुसार, स्थानिक पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहून संभाव्य हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी कार्यरत आहेत.

सणाच्या काळात मुंबईतील(Mumbai) नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *