News Bharati

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही

सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला मत देणार नाही.

https://x.com/i/status/1847240711403622823


अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. विकासाचे स्वप्न बघणारे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे सरकार पाहिजे आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार विकासाची कामे करणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

दसरा मेळाव्यातील उध्दव ठाकरेंच्या भाषणाबद्दल बोलताना त्यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंची परिस्थिती शोलेमधल्या जेलरसारखी असल्यासारखे त्यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीच्या गटासंबंधीही त्यांनी टिकास्त्र डागले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *