हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन […]