News Bharati

\”बाई काय हा प्रकार… तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा.?\” रुपाली पाटील ठोंबरे यांचा कोणावर निशाणा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (राष्ट्रवादी) दोन महिला नेत्यांमधील मतभेद विशेष चर्चेत आले आहेत. रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) आणि रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या दरम्यानचा वाद उफाळून आला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करून एक टीका केली आहे, ज्यामध्ये त्यांनी \”बाई काय हा प्रकार… तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा?\” अशी उपरोधिक टिप्पणी केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची पुन्हा नियुक्ती झाल्याने हा वाद उद्भवला आहे. यामुळे रुपाली पाटील ठोंबरे या नाराज झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी एका व्यक्तीकडे अनेक भूमिका दिल्या जाण्याच्या निर्णयावर टीका करत \”एक व्यक्ती, एक पद\” या तत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत अंतर्गत कलह वाढला असून, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या या पोस्टमध्ये #दयाकुछतोगडबडहै आणि #दालमेंकालानहीपुरीदालहीकालीहै या हॅशटॅगचा वापर करत उपरोधात्मक शैलीत काही निर्णयांच्या पुनरावृत्तीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षाच्या एकजुटीवर आणि निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रुपाली पाटील ठोंबरे पोस्टमध्ये काय म्हणाल्या ते पहा…

\”बाई काय हा प्रकार…किती वेळा तेच ते..\”रात्रीस खेळ चाले\” ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं.. पण छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा.!! तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा.? #दयाकुछतोगडबडहै #दालमेंकालानहीपुरीदालहीकालीहै,\” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे अंतर्गत वाद पक्षाच्या एकजुटीवर आणि रणनीतीवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतात. हा वाद पक्षातील सत्तासंघर्ष आणि नेत्यांमधील मतभेदांचा समतोल साधण्याची आव्हाने अधोरेखित करतो. विशेषत: रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या दोन प्रभावशाली व्यक्तींच्या वादाचा पक्षाच्या नेतृत्वावर कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या वादाच्या निराकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाची दिशा निश्चित होईल, आणि त्यावरच अंतर्गत एकजुटीचे मॉडेल तयार होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *