News Bharati

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारताच्या फिनटेक क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकत फिनटेक स्टार्टअपमध्ये 10 वर्षांत 500 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले. UPI हे भारताच्या फिनटेक यशाचे एक मोठे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदी यांनी सांगितले की, \”एक काळ असा होता की लोक भारतात आले की आमच्या सांस्कृतिक विविधतेला आश्चर्य वाटायचे. आता ते आमच्या फिनटेक विविधतेला आश्चर्याने पाहतात.\” त्यांनी फिनटेक क्षेत्राने आर्थिक सेवांना जनतेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही सांगितले.

या भाषणानंतर, पंतप्रधान मोदी पालघरला दौरा करणार आहेत जिथे ते वाढवण बंदराच्या ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. हे बंदर भारताच्या समुद्री कनेक्टिव्हिटीला बळकट करणार आहे आणि व्यापार वाढवणार आहे.

मोदी यांच्या भाषणाने फिनटेक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे वैश्विक पातळीवर कौतुक केले जात आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *