News Bharati

…तर व्होट जिहादचा सामना करावा लागेल : देवेंद्र फडणवीस

धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचाराचे वातावरण चांगलेच रंगले आहे. आज धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकदा पुन्हा व्होट जिहादचा (Vote Jihad) आरोप केला.

ते म्हणाले, \”मला आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात धुळ्यातून होत आहे. मोदींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत धुळे जिल्ह्यात अनेक मोठे बदल झाले आहेत. आज धुळे महाराष्ट्रातील नंबर एक जिल्हा बनला आहे. धुळे शहराला कधीही पाणीटंचाई भासणार नाही. धुळे हे महाराष्ट्राचे पुढचे इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक सेंटर बनणार आहे.\”

त्यांनी पुढे म्हटले, \”एकीकडे आम्ही विकास साधत आहोत, तर दुसरीकडे विकासाला अडथळा निर्माण करण्यासाठी धुळ्यात व्होट जिहाद केला जात आहे. लोकसभेतील व्होट जिहादमुळे धुळ्याची जागा गेली. आता जर जागे न झाले, तर पुन्हा व्होट जिहादला सामोरे जावे लागेल. ही निवडणूक जागरूक होण्याची आहे,\” असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *