News Bharati

भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर समाज कंटकांकडून दगडफेक

भिवंडी येथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. हि दगडफेक भिवंडी येथे मशिदीजवळ घडली या मुले एकदा पुन्हा सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. ही घटना हिंदू समाजासाठी फक्त एक दुखद प्रसंग आहे . गणपती विसर्जन हा शांततेचा, सांस्कृतिक समृद्धीचा आणि एकतेचा क्षण असल्याचे म्हटले जाते, पण असे प्रकार हे मूल्यांना धक्का देतात. आणि हे प्रकारे वारंवार घडताना दिसून येतात

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला असून, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण आहे आणि राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस बळाची तैनाती केली आहे. ही घटना महाराष्ट्रातील सांस्कृतिक सामंजस्याचा उल्लेख करते, ज्यामुळे समाजाच्या विविध वर्गांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

जर अशा प्रकारची हिंसा सतत वाढत राहिली, तर त्याचा परिणाम आपल्या समाजाच्या सांस्कृतिक संपन्नतेवर होणार आहे, जे कदापि स्वीकार्य नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *