News Bharati

द मालेगाव फाइल्स

एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या देशांमधील परिस्थिती बघून कळून येते. भारत जे एक हिंदू बहुल राष्ट्र आहे, तेथील एक भाग जेव्हा “मुस्लिम बहुल बनतो”, तेव्हा तेथे हिंदूंची काय परिस्थिती होते ते आपल्याला “पश्चिम बंगाल” आणि केरळ मधील मलप्पुरमकडे बघून कळून येते.

अलीकडे हिंदवी स्वराज्याची सुरवात जेथून केली अशा महाराष्ट्रातसुद्धा असेच काही झाले असून, त्या भागाची परिस्थतीती इतकी बिकट झाली आहे कि, तेथील 100 हून अधिक मंदिरे आता रिकामी आहेत, त्या भागात हिंदू राहत नाही.

नुकताच Organiser च्या व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रातील मालेगावमधील (Malegaon) गंभीर वास्तव समोर आणले आहे. मालेगावमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तेथे फिरणाऱ्या कुणालाही कराची किंवा इस्लामाबादसारख्या पाकिस्तानातील शहरात आल्याचा अनुभव येतो. मालेगावमधील अनेक प्राचीन हिंदू मंदिरे जी आधी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक होती, ती आता दुर्लक्षामुळे खंडहरांमध्ये बदलली आहेत. या भागातील अल्पसंख्याक हिंदू समुदाय सतत भयाच्या छायेत आपले जीवन जगत असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होते.

मालेगावमधील लोकसंख्यावाढीच्या बदलांमुळे शहरातील धार्मिक आणि सामाजिक संरचनेत लक्षणीय परिणाम दिसून येतो. येथे मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने, अनेक मंदिरे मूर्तीरहित झाली आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात मुस्लिमांची संगठित वस्ती झाल्याचे दिसते, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक संतुलन बदलले आहे.

“रलीव चालिव गलीव “

२००१ मध्ये झालेल्या दंगलीनंतर मुस्लिमांना घाबरून अनेक हिंदू लोक त्यांचे घर सोडून, दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत. तिथे परिस्थती इतकी गंभीर आहे कि, ज्या भागात आधी ६०-७० टक्के हिंदू लोकसंख्या होती, ती लोकसंख्या २-३ टक्क्यांवर आली आहे. माहितीनुसार २००१ मध्ये जेव्हा या भागात दंगल झाली होती, त्यावेळी इस्लामी जिहाद्यांनी अनेक हिंदू महिलांचे स्तन कापून टाकले होते.

काश्मीरमध्ये जे घडले त्याच्याशी समांतर आहे, जिथे हिंदू आणि त्यांच्या स्त्रिया आणि मुलींना अनेक हल्ले आणि धमक्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना त्यांची जमीन सोडून पळून जावे लागले. त्याचप्रमाणे मालेगावातील हिंदू आपली घरे सोडत आहेत, नुसती ठिकाणे सोडत नाहीत तर आपल्या देवदेवतांनाही घेऊन जात आहेत.

कधीकाळी \”मोक्ष गंगा\” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीने मालेगाव शहराला विभागले होते. परंतु, आता ती \”मोसम नदी\” म्हणून ओळखली जाते, विशेषतः या भागातील उर्दू भाषिकांची वाढती संख्या यासाठी कारणीभूत ठरली आहे. ही नदी शहराला दोन भिन्न विभागांमध्ये विभागते – एक हिंदूबहुल तर दुसरा मुस्लिमबहुल.विशेष म्हणजे, रिकामी आणि उपेक्षित मंदिरे मुस्लिमबहुल भागात आढळतात. काही मंदिरे अजूनही आपली पारंपरिक रचना टिकवून आहेत, तर काही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत आहेत.

खरं सांगायचे झाले तर, मालेगावमध्ये फक्त आता शरिया लागू करायचे बाकी आहे.. मालेगावमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जर एखादा हिंदू या भागात गेला, तर तो सुरक्षितपणे परत येईल याची हमी देता येत नाही, असे स्थानिकांकडून समजते. जम्मू काश्मीरमध्ये जसा काश्मिरी पंडितांचा नरसंहार झाला. ज्याप्रकारे तेथील सामाजिक संरचनेचे विघटन झाले, त्याचप्रकारे महाराष्ट्रातील काही भागांमध्येही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात अनेक ठिकाणी इस्लामिक जिहाद्यांची लोकसंख्या वाढत आहे. गुजरातमधील नवसारी येथील 150 ते 200 इस्लामवाद्यांच्या जमावाने 7 डिसेंबरच्या रात्री नवसारीच्या दर्गा रोड परिसरात राहणाऱ्या हिंदूंवर, विशेषतः महिलांवर हल्ला केला. वाहन पार्किंगवरून स्थानिक मुस्लिम तरुणाशी वाद झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने स्थानिक मुस्लिम लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. 100-150 मुस्लिमांच्या जमावाने महिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

जर अशा घटना थांबल्या नाहीत व मुस्लिम लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर धर्माच्या आधारावर भारताचे पुन्हा विभाजन होण्यापासून थांबवू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *