News Bharati

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी काल दिली.

या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर अण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर अनेक समविचारी नेते एकत्रित आले होते. आमचे सरकार एका झेंड्याचे नसेल तर आमच्या डोक्यात तिरंगा असेल, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *